कोलकता : देशात आज असे अनेक लोक आहेत जे तपास यंत्रणांच्या भीतीने पळून जातात, आम्हाला भिऊन नाही. तुम्हाला जे काही करता येईल ते करा आणि आमच्याकडून सर्वकाही घ्या पण देश विकू नका. तपास यंत्रणांनी आम्हाला कितीही त्रास दिला तरी चालेल; पण देश एकसंध राहू द्या. संविधानाचे उल्लंघन करणे म्हणजे लोकांच्या अधिकारांचे उल्लंघन करणे हो, असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
सोमवारी कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमात शंखही फुंकला. पश्चिम बंगाल सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेताजींच्या कुटुंबातील सदस्य सुगाता बोस, सुमनत्रा बोस आणि चंद्र कुमार बोस हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना ममता बॅनर्जी बोलत होत्या.
आगामी कोलकाता बुक फेअर 2023 मध्ये बॅनर्जी 50 स्वातंत्र्यसैनिकांवरील पुस्तकाचे अनावरण करणार आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, असे अनेक स्वातंत्र्यसैनिक आहेत जे आपल्याला आठवत नाहीत. अनेक अज्ञात स्वातंत्र्यसैनिक आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना माहिती नाही. कोलकाता पुस्तक मेळ्याच्या यंदाच्या आवृत्तीत मी अशा पन्नास स्वातंत्र्यसैनिकांवरील पुस्तक प्रकाशित करणार आहे.
मार्ग भिन्न असला तरी ‘नेताजी बोस’ व संघाचे उद्दीष्ट एकसमान – मोहन भागवत
ममता बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, “तपास यंत्रणांच्या नावाने बंगालची बदनामी केली जात आहे आणि धमकावले जात आहे. पण मला कोणीही धमकावू शकत नाही. बंगालमध्ये 50 हून अधिक केंद्रीय पथके पाठवली आहेत. तर मग उत्तर प्रदेशात किती पथके पाठवली आहेत? तुम्ही इतक्या लोकांना जास्त काळ मूर्ख बनवू शकत नाही. कोणाला नेताजींचा आदर करायचा असेल तर बंगाली भाषेचाही आदर केला पाहिजे.