Mallikarjun Kharge । लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून सरकार स्थापन करण्यात आलं आहे. याच केंद्रातल्या सरकारवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सडकून टीका केलीय. याविषयी बोलताना त्यांनी “एनडीए सरकार हे चुकून स्थापन झाले असून पुढील काळात हे सरकार कधीही कोसळू शकते,” असे धक्कादायक विधान देखील आहे.
त्यामुळे हे सरकार कधीही पडू शकते Mallikarjun Kharge ।
मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना,“एनडीए सरकार चुकून स्थापन झाले आहे. मोदींकडे बहुमत नाही. त्यांचे सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे हे सरकार कधीही पडू शकते. आम्हाला तर वाटते सरकार पाच वर्ष चालावे, देश चांगल्या पद्धतीने चालला पाहीजे. देश बळकट करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन काम करू. पण आमच्या पंतप्रधानांची सवय आहे की, जी गोष्ट व्यवस्थित सुरू आहे, ती त्यांच्या पचनी पडत नाही. आमच्या बाजूने आम्ही देशासाठी काम करत राहू.”असे म्हटले आहे.
त्यांनी आपल्या कार्यकाळातील पंतप्रधानांकडे पाहावे Mallikarjun Kharge ।
खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आघाडीच्या सरकारवर टीका करताचत्यांचा मित्रपक्ष जेडीयूने याला उत्तर दिले आहे. बिहारचे माजी मंत्री आणि विद्यमान विधानपरिषदेचे आमदार नीरज कुमार यांनी खरगेंच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरगे यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील कामगिरीकडे आधी पाहावे, असा पलटवार नीरज कुमार यांनी केला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जितक्या जागा जिंकल्या आहेत, साधारण तितक्याच जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. जेव्हा कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हते, तेव्हा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पीव्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली अल्पमताचे सरकार स्थापन केले गेले. तेही सरकार काँग्रेसने तडीस नेलेच होते. नरसिंहराव यांनी दोन वर्षांत छोट्या पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस सरकारला बहुमतात आणले. खरगे यांना काँग्रेसचा हा इतिहास माहीत नाही का? असा सवाल उपस्थित करत नीरज कुमार पुढे म्हणाले की, काँग्रेस आता ९९ च्या फेऱ्यात अडकली आहे.
हेही वाचा
कोकणात उदय सामंत यांच्या बॅनरमधून थेट राणेंना इशारा, ‘जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे…’