मुंबई : मालाड मधील पिंपरोपाडा येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मुंबईत झालल्या अतिवृष्टीत मालाड येथे भिंत कोसळून अनेक लोकांना जीव गमवावा लागला, ही अतिशय दुर्देवी घटना आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या आप्तेष्टांप्रती मी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करतो तसेच सर्व जखमींना लवकर बरे वाटावे,यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात सांगितले आहे.
#मालाड येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले तीव्र दुःख.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 2, 2019
दरम्यान, मुंबईतल्या मालाडमध्ये असलेल्या कुरार या ठिकाणी भिंत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी (2 जुलै) रात्री 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अती पावसामुळे ही भिंत खचली आणि त्याखाली दबून 13 जणांचा मृत्यू झाला.