मुंबई: ईव्हीमवर पुन्हा एकदा तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपीएटीची समस्या नसून शेवटी मतमोजणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे आम्ही दिल्लीतील तज्ज्ञ आणि विपक्षी सदस्यांशी चर्चा करून या प्रकरणाच्या खोलात जाऊन विचार करू, असे शरद पवार म्हणाले.
मतदारांनी केलेलं मतदान त्यांनी निवडलेल्या उमेदवाराला जात नसेल आणि हे त्यांना जाणवले असेल. तर ते आता शांत बसू शकतात. पण भविष्यात ते कायदा हातात घेऊ शकतात. आपण तसे घडू दिले नाही पाहिजे. तसेच बाँम्ब स्फोटातील आरोपीना तिकीट देणे म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याचे शरद पवार म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलतांना पवार म्हणाले, नवीन पिढीला निवडणूक प्रक्रियेत संधी दिली पाहिजे. लोकांना बदल हवा आहे. नवीन चेहेऱ्यांना संधी दिली पाहिजे. कष्टकरी तरूण चेहरांना संधी दिली पाहिजे. हा सर्व बदल करण्याची खबरदारी प्रदेशाध्यक्षांनी घ्यावी, अशी सूचनाही पवारांनी दिली.
Giving tickets to bomb blast accused an attack on democracy: Sharad Pawar
Read @ANI Story | https://t.co/hMAYtuMqRH pic.twitter.com/mEf5OA4PB2
— ANI Digital (@ani_digital) June 10, 2019
NCP leader Sharad Pawar: If people realise that the vote they are casting is not going for their candidate of choice, they may keep calm now but they may take law into their hands in future. We should not allow that to happen. https://t.co/GCrgGLf91K
— ANI (@ANI) June 10, 2019