पुणे -23 गावांमुळे महापालिकेचे क्षेत्रफळ राज्यात सर्वात मोठे झाले आहे, पालिकेची आर्थिक स्थितीही बेताची असून या गावांमधून महापालिकेस फारसे उत्पन्नही मिळणार नाही.
त्यामुळे, राज्य शासनाने या गावे घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अथवा या गावांच्या नियोजनासाठी दोन महापालिका कराव्यात, अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने करण्यात आली आहे.
23 गावांच्या समावेशाबाबत पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी महापौर सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे सहसचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष परशुराम वाडेकर, अशोक शिरोळे आदी उपस्थित होते.