मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणामुळं राज्याचं राजकारण तापलं आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेले आहे. यावरून विरोधक ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात शिवसेना खासदार संजय राऊत सरकारची बाजू मांडत आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा, त्यांच्याशिवाय मंत्रिमंडळामधील कुणीच मंत्री बोलत नाहीत, असा त्यांनी लगावला आहे.
दोन तपास यंत्रणाकडून तपास सुरु आहे. हळूहळू सत्य बाहेर येत असून लवकरच सरकारचा बुरखा फाटणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, तुमच्याकडे पुरावा असेल, काही माहिती असेल तर ती द्या. हवेत तीर मारू नका. थेट बोला, असं संजय राऊत यांनी म्हंटल होते.