मुंबई – ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने शानदार विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. सोशल मीडियावर सध्या भारतीय संघाच्या कसोटी मालिका विजयाचीच चर्चा आहे. त्यात आता या ऐतिहासिक विजयावर चित्रपट बनविण्याची मागणी करण्यात येत आहे. अभिनेता कार्तिक आर्यन याने ही मागणी केली आहे.
अंतिम आणि चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने रिषभ पंत आणि शुबमन गिलच्या शानदार खेळीच्या जोरावर 3 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाने चार सामन्यांची मालिकात 2-1 अशा फरकाने जिंकली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही दैदिप्यमान कामगिरी केली आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने अनोख्या शुभेच्छा देताना, भारताच्या ब्रिस्बेन विजयावर एखादा चित्रपट बनला पाहिजे असे म्हटले आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने भारतीय संघाचा फोटो शेअर करताना त्याला कॅप्शन दिले आहे की ‘या सामन्यावर तर चित्रपट बनायला हवा. काय अफलातून ऐतिहासिक विजय होता.’