गडचिरोली – सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. शेतकऱ्यांनीची पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच शेतातील मजूंराअभावी गडचिरोली जिल्ह्यात कापूस वेचणीही रखडलेली आहे. याच शेतकऱ्यांची मदती आता गडचिरोली पोलिसांनी केली आहे.
कापूस वेचणीसाठी गावात मजूर मिळत नाही, परंतु हवेमुळे कापूस फुटून वाऱ्याने उडाल्याने नुकसान होत असलेल्या शेतकऱ्याला, उप पोलीस ठाणे रेगुंठा येथील अधिकारी व कर्मचार्यांनी मिळून शेतकऱ्याला २ एकरातील जवळपास ३- ४ क्विंटल कापूस वेचून दिला .#GadchiroliPolice pic.twitter.com/68EFf9kE7l
— GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) December 2, 2021
नक्षलग्रस्त गडचिरोली भागात पोलीस अनेकवेळा वेगवेगळ्या कामांसाठी जनतेची मदत करत असतात. अशीच एक घटना नुकतीच घडली. पोलिसांनी एका शेतकऱ्याच्या दोन एकर शेतात फुटलेला कापूस वेचला. गडचिरोली पोलिसांनी हे ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर नेटीजन्स याचे ‘जय जवान, जय किसान’ म्हणून कौतुक करत आहेत.
शेती व्यवसयात गटाने काम केले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, आजही गावातील शेतकरी एकवटलेले नाहीत पण याचे महत्व रेगुंठा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अधिकारी यांना कळलेले आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे कापसाचे नुकसान होत आहे. वाऱ्यामुळे पांढरे सोने अस्ताव्यस्त होत असताना शेतकऱ्याचे हाल पाहवले नाहीत म्हणून रेगुंठा पोलीस ठाण्यातील 14 अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर आले आणि एका दिवसामध्ये त्यांनी 2 एकरामध्ये 3 ते 4 क्विंटल कापसाची वेचणी केली आहे.