नवी दिल्ली – बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बाराबंकी देवा पोलीस स्टेशन परिसरातील किसान मार्गावरील बाबुरहिया गावाजवळील किसान मार्गावर गुरुवारी सकाळी झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांच्यासह पोलीस दल दाखल झाले असून त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.
देवा कोतवाली परिसरातील माती चौकी अंतर्गत बाबुरीया येथील किसान पथवरून प्रवासी बस गुरुवारी सकाळी 4 वाजून 45 मिनीटांनी दिल्ली वरून जात असता समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. धडक ऐवढी भीषण होती की यामध्ये बसचा चुराडा झाला.
पोलिसांनी बचाव कार्य सुरु केले आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ आनन-फानन जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्याचे काम सुरु केले आहे.
पोलिस अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, आतापर्यत 12 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात उपरासाठी पाठविण्यात येत आहे. मात्र आतार्यंत किती जणांचा मृत्यू झाला हे अजून सांगणे कठीण आहे.