सर्वप्रकारच्या कर्जदारांना दिलासा
नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे अर्थव्यस्थेवर वाईट परिणाम होत असून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सातत्याने मोठ्या घोषणा करत आहे. अशातच आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही व्याजदरात कपात केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केली असून रिव्हर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, रेपो दर ५.१५ वरून ४.४ वर आला आहे. तसेच रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होणार आहे.
Repo rate reduced by 75 basis points to 4.4.%. Reverse repo-rate reduced by 90 basis points to 4%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/eBb0WPAG21
— ANI (@ANI) March 27, 2020
याशिवाय कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही शक्तिकांत दास यांनी बँकांना यांनी दिला आहे. यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर कोरोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता आहे. यामुळे करोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेनं सीआरआर कमी करून तो ३ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे बाजारात ३ लाख ७४ हजार कोटी रूपये खेळते होतील, असेही त्यांनी सांगितले.
All commercial banks including regional rural banks, cooperative banks,NBFCs (including housing finance companies)&lending institutions are being permitted to allow a moratorium of 3 months on payment of installments in respect of all term loans outstanding as on March 1: RBI Guv pic.twitter.com/L6xl2lpu1w
— ANI (@ANI) March 27, 2020