जेंव्हा बॉलीवूडमध्ये पाकिस्तानी कलकारांच्या काम करण्यावर बंदी घातली गेली, तेंव्हा शाहरुख खानच्या “रईस’मधून लीड रोल करणारी पाकिस्तानी ऍक्ट्रेस माहिरा खान चांगलीच धास्तावली होती.”रईस’नंतर तिला भारतातल्या अनेक वेब सिरीजची ऑफर मिळाली होती.
मात्र पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीमुळे तिला ही ऑफर स्वीकारता आली नव्हती. त्या वेबसिरीजची कथा खूपच चांगली होती. त्यात काम करणारे कलाकारही खूप चांगले होते. एकूणच ती ऑफर खूप चांगली होती.
मात्र त्यावेळी आपल्याला खूपच भीती वाटत असल्याने ही ऑफर स्वीकारली नव्हती, असे माहिरा म्हणाली. अर्थात ही बंदी म्हणजे एक राजकारण होते, हे जरी खरे असले तरी त्यावेळी आपण काय करायला पाहिजे, आणि काय करायला नको हे आपल्याला काहीच समजत नव्हते. असेही माहिराने प्रांजळपणे कबूल केले.
2016 मध्ये उरी येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. तर 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागावर पूर्ण बंदी घातली आहे.
अलीकडेच एका चॅनेलवर तिला कथावाचन करण्याची संधी मिळाली. तिने आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दल सांगतानाच भारतीय प्लॅटफॉर्मवर काम करताना वाटत असलेली भीती देखील कथन केली आहे.