सातारा – कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना भाजपकडून नाहक त्रास देण्याचा उद्योग होत असून राहुल गांधी यांच्यावर चुकीच्या पध्दतीने कारवाई करुन त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्रित येत पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी भाजपच्या दंडेलशाहीचा जोरदार निषेध करण्यात आला.
मोदी सरकारचा खरा चेहरा पुढे आणल्याने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोदी सरकार त्रास देत आहे. त्यांची खासदारकी चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आली असल्याचा आरोप करत या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सौ. सत्वशिला चव्हाण, तेजस शिंदे, नरेश देसाई, जगन्नाथ कुंभार, दीपक पवार, समिंद्रा जाधव, वैशाली जाधव, अल्पना यादव, वर्षा देशपांडे, धनश्री महाडिक, रजनीताई पवार, राजेंद्र शेलार, बाळासाहेब शिरसाट, अभिजित पाटील, निवास थोरात, राजकुमार पाटील, ऍड. दत्तात्रय धनावडे, मनोजकुमार तपासे, सुषमाराजे घोरपडे, छायादेवी महाडिक, नीलम येडगे, विष्णुपंत अवघडे, विजयराव मोरे, ऍड. श्रीकांत चव्हाण, संदीप माने, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, समविचारी पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या.