मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ ढीली झाल्याची टीका सुजय विखे पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी जे काल वक्तव्य केले आहे त्यावरून ते ही राष्ट्रवादीला रामराम देतील असे वाटत असल्याचे सुजय विखे पाटलांनी म्हटले आहे.
सुजय विखे पाटील आज श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. शरद पवार यांचा राजीनामा ही पक्षांतर्गत बाब आहे. जशी समुद्राची वाळू मुठीत घट्ट पकडल्यानंतर ती तितक्याच्या वेगाने ढीली होते. त्या प्रमाणे महाविकास आघाडी वज्र मुठ आहे, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी केली.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच निम्मा कार्यक्रम केला आहे. आता राहिलेला कार्यक्रम करतील असा टोला ही खासदार विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून लगावला आहे.