मुंबई – राज्यात करोनाची तिसरी लाट आता ओसरत चालली आहे. एकीकडे करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आतापर्यंत मास्क हे अत्यंत प्रभावी शस्त्र ठरले आहे. पण आता करोनाची लाट पाहता राज्य मास्कमुक्त करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्यासंदर्भात भूमिका घेतलेली असताना आपणही भूमिका घेणार का? अशी चर्चा मंत्रिमंडळात करण्यात आली. राज्यात मास्क वापरणे आता गरजेचे नसणार अशी चर्चा यावेळी झाली. राज्यातील कोविड संसर्गाची परीस्थिती आणि संभाव्य असलेल्या चौथी आणि पाचव्या लाटेची शक्यता आहे. या सर्वांचा सखोल अभ्यास करूनच राज्य सरकार निर्णय घेणार आहे.