नागपूर – महाराष्ट्राचे विभाजनाचा मुद्द्यावर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते म. गो. वैद्य यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्राला तीन ते चार भागात विभागले जाऊ शकते. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या आधारे राज्याचे विभाजन करणे चुकीचे नसेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वैद्य म्हणाले कि, २०११च्या जणगणेनेनुसार महाराष्ट्राची ११.२ कोटी लोकसंख्या आहे. ३०७७१३ किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. यानुसार उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो. उत्तरप्रदेशची लोकसंख्या १९.९ कोटी आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे विभाजन करणे चुकीचे नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, म. गो. वैद्य यांनी याआधीही महाराष्ट्राच्या विभाजनावर भाष्य केले होते. २०१६ मध्ये त्यांनी म्हंटले कि, महाराष्ट्राची लोकसंख्या तीन कोटी आहे. राज्याचे छोट्या-छोट्या विभागात विभाजन केल्यास अनेक समस्यांचे नाकारणं होऊ शकते, असे मत त्यांनी मांडले होते.