नाशिक – जे पाणी आपलं आहे ते आपलंच आहे… आपलं पाणी गुजरातला देऊ नका, अश्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. नाशिक विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्याची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित आमदारांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या.
दरम्यान, गुजरातचे पाणी आणि महाराष्ट्राचे पाणी हा वादच आता राहिलेला नाही. आपल्या राज्याचं पाणी हे राज्यातील जनतेच्याच हक्काचं असून ते पाणी गुजरातला जाऊ नये, आपलं पाणी आपल्या कडे कसं आणायचं यावर काम सुरु करा, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.