Maharashtra Politics : विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आता राज्यातील राजकारण विधानपरिषद निवडणुकीभोवती फिरू लागले आहे. ९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे पारडे जड मानले जात असून, बहुतेक जागांवर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. (Maharashtra Politics) राज्यातील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार, महायुतीला ८ जागा सहज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष ५, शिवसेना २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १ जागा जिंकू शकतात. (Maharashtra Politics) दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे सुमारे ४६ आमदार असल्याने त्यांचा एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. या एकमेव जागेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दावा केला आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांच्या नावासाठी आग्रह धरला जात आहे. मात्र, या नावाला काँग्रेसकडून विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics) याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पर्यायी नाव पुढे येऊ लागले आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे विधानपरिषद निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्यास ही जागा काँग्रेसने मिळावी, अशी भूमिका पक्षाने घेतल्याचे संकेत आहेत. दरम्यान, निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांचा समावेश असून, शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या दोन जागांसाठीही पक्षात अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra Politics)