औरंगाबाद – महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम यावर्षी लवकर सुरू होईल, असे एका वरीष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून हा हंगाम सुरू होणार आहे, दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी हा गळीत हंगाम सुरू होतो.
महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत चालतो. तथापि, 2021-22 हंगामात, पिकाच्या विक्रमी उत्पादनामुळे गाळप प्रक्रिया मे अखेरपर्यंत लांबली. महाराष्ट्राने 2021-22 च्या हंगामात 137.28 लाख टन साखरेचे उत्पादन करून विक्रम प्रस्थापित केला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 31 लाख टन अधिक आहे.
मागील हंगामातील ऊस आणि साखरेचे विक्रमी उत्पादन पाहता, महाराष्ट्रातील साखर कारखाने यावर्षी लवकर उत्पादन सुरू करतील असे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी पीटीआयला सांगितले.
“…तर शिवसैनिक सहन करणार नाहीत”; बंडखोर आमदारांना चंद्रकांत खैरे यांचा इशारा
साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा साखरेचे उत्पादन 138 लाख टन इतके अपेक्षित आहे. गेल्या हंगामात कार्यरत असलेल्या साखर कारखान्यांची संख्या 200 होती, ती यावर्षी तीनने वाढण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा जुना व्हिडीओ शेअर करत इम्प्तियाज जलिल यांची टीका; म्हणाले…