मुंबई – अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजपाने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिले आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या कि, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर चिखलफेक करनाऱ्यांना मी आठवण करून देते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे. मुन्ना यादव सारख्या गुंडांला महामंडळ देणाऱ्या, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. म्हणून माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीने तरी राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये, अशा शब्दात भाजपवर टीका केली आहे.
मुन्ना यादव सारख्या गुंडांला महामंडळ देणाऱ्या, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
म्हणून माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीने तरी राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये !— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 20, 2020
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सुशांत प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारकडून माफी मागावी. शिवसेनेचे न्यायविरोधी कृत्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचाही हिस्सा असल्यामुळे प्रमुख नेत्यांनीही माफी मागावी, अशी मागणीदेखील बिहार भाजपने केली होती.