Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षात पुन्हा एकदा मोठा अंतर्गत वाद (Maharashtra Politics) समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पक्षाला फक्त ६ नगरसेवक निवडून आले, तर जिल्हा परिषदेत संख्या ९ पर्यंत खाली आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या नेत्यांवर जबाबदारी सोपवली होती, त्यांनी पक्ष संपवल्याचा गंभीर आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरे यांनी (Maharashtra Politics) सांगितले की, “शहर आणि जिल्ह्यातील आपल्याच पक्षातील काही नेत्यांनी शिवसेना संपवली आहे. माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात कधी माझ्यावर एक लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोपही आला नाही. इथे तर आपल्याच पक्षातील सदस्यांनी एका नेत्यावर १८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तरीही पक्षाकडून कोणतीही कारवाई होत नाही.” Maharashtra Politics “मी मुंबईला जाऊन उद्धव साहेबांना हात जोडून विनंती करणार” चंद्रकांत खैरे यांनी अप्रत्यक्षपणे अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधत म्हटले, “मी स्वतः मुंबईला जाऊन उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती करणार आहे की, साहेब आता तरी या नेत्यांवर कारवाई करा. या नेत्याने शिवसेना संपवली आहे. उद्धवसाहेबांनी आतातरी लक्ष घालावे.” खैरे यांनी पुढे म्हटले, “मी कोणाचेही नाव घेणार नाही. शिवसेना कोणी संपवली, कोणावर १८ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे, हे सगळ्यांना माहित आहे. मी नाव कशाला घेऊ?” जिल्हा परिषदेत फुट आणि भाजपाचा आरोप छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाने थेट शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तीन सदस्य फोडल्याचा आरोप खैरे यांनी केला. शिंदे गटासोबत जाऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न फसला, असेही त्यांनी सांगितले. अंबादास दानवे यांनी स्वतः काही सदस्यांची सत्तेत जाण्याची इच्छा असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. सहलीवर गेलेल्या काही सदस्यांपैकी दोघे भाजपाच्या गळाला लागले. यानंतर उद्धव ठाकरे गटाचे झेडपी सदस्य संजय निकम यांनी पत्रकार परिषद घेत अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “दानवे यांनी आम्हाला डांबून ठेवले आणि आमचा परस्पर सौदा केला”, असा आरोप निकम यांनी केला होता. पक्षाने दिलेली जबाबदारी आणि राज्यसभा इच्छा चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, पक्षाने त्यांच्यावर लातूर, धाराशीव आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे ते त्या जिल्ह्यांत काम करत होते, तर शहराची जबाबदारी दुसऱ्या नेत्याकडे होती. राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना खैरे म्हणाले, “मागील वेळी मी इच्छुक होतो, तेव्हा साहेबांनी प्रियंका चतुर्वेदी यांना संधी दिली. यावेळी पुन्हा प्रियंका चतुर्वेदी यांचेच नाव चर्चेत आहे. मी उद्धव ठाकरेंकडे राज्यसभेवर संधी मिळावी, अशी मागणी केली आहे.” चंद्रकांत खैरे यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटात (Maharashtra Politics) अंतर्गत असंतोष अधिक तीव्र झाला असून, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे पक्षातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.