नाशिक – नाशिक पदवीधर मतदारसंघातून कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा 29,465 मतांनी पराभव केला. या विजयात सत्यजित यांना भाजपासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही मदत झाल्याची चर्चा आहे.
विजयानंतर तांबेंना भाजपाकडून पक्षप्रवेशाची खुली ऑफर आल्यानंतर, आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. त्यात तांबेंच्या विजयानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजप व तांबेंवर तोफ डागली आहे.
पटोले यांनी विधान परिषद, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पटोले म्हणाले की, नशिकमध्ये सुधीर तांबेनी आमच्यासोबत विश्वासघात केला. भाजपने दुसऱ्यांची घरे फोडण्याचे काम केले आहे. त्याचे परिणाम आता भाजपला भोगावे लागतील. त्यांनी कॉंग्रेसचा एक नेला तर आम्ही आमच्या नाशिक विभागात 50 आमदार उभे करू. मग भाजप आमचे किती आमदार घेऊन पळतात, हे पाहू. प्रजा कोण, राजा कोण, जनतेने याचे उत्तर दिले पाहिजे. भारत जोडोचा निवडणूकीवर सकारात्मक परिणाम झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राष्ट्रीय छात्र सैनिकांनी डोळ्यापुढे ठेवावा – राज्यपाल कोश्यारी
पटोले पुढे म्हणाले, सत्यजित यांनी जर आमच्याकडे उमेदवारी मागितली असती तर त्यांना देण्यात आली असती. परंतु, तांबेंना सर्वांकडून पाठिंबा मिळविण्यासाठी आमची उमेदवारी नको होती.