पुणे – नाशिक पदवीधर मतदारसंघातून कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा 29,465 मतांनी पराभव केला. या विजयात सत्यजित यांना भाजपासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही मदत झाल्याची चर्चा आहे. विजयानंतर तांबेंना भाजपाकडून पक्षप्रवेशाची खुली ऑफर आल्यानंतर, आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे.
त्यात तांबेंच्या विजयानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजप व तांबेंवर तोफ डागली असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विजयानंतर सत्यजित तांबे यांना कॉंग्रेसमध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे.
याविषयी बोलताना पवार म्हटले की, सत्यजितला उमेदवारी देण्यासाठी शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन केला होता. परंतु, गोष्टी जुळल्या नाहीत. तरीही सत्यजितने झालं गेलं विसरून कॉंग्रेसमध्येच राहावे.
Maharashtra Politics : तांबेनी आमच्यासोबत विश्वासघात केला – नाना पटोले
पुढे ते म्हणाले की, सुधीर तांबे आणि बाळासाहेब थोरात सत्यजितला व्यवस्थित मार्गदर्शन करतील. कारण, सत्यजितचे तीन पिढ्या कॉंग्रेसच्या विचारसरणीच्या आहेत. वरिष्ठांशी सत्यजितचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने आणि सत्यजीतने फार ताणून धरू नये. असं देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.