मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे विविध उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. अनलॉकच्या प्रक्रियेत व्यवसाय पुन्हा सुरु झाले आहेत. मात्र, अनेक व्यवसाय सुरु करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नव्हती.
या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवसास्थानी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले होते. राज ठाकरेंनीही पुढाकर घेत अनेक अडचणी सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावली.
यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 16, 2020