मुंबई – राज्यात वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यात पुन्हा लाॅकडाऊन केला जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र लाॅकडाऊन नसला तरी विकेंड लाॅकडाऊन, नाईट कर्फ्यू आणि इतर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लाॅकडाऊन असणार आहे. तसेच इतर दिवशी नाईट कर्फ्यू असेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.
जाणून घ्या नवीन नियमावलीनुसार काय सुरु काय बंद –
-
शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन
-
लोकल ट्रेन सुरू राहणार.
-
जिम बंद होणार, हाॅटेलमधून पार्सल सेवा सुरु असेल.
-
अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, उद्याने पूर्णत: बंद
-
रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
-
सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
-
धार्मिक स्थळांवर निर्बंध, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद, गार्डन, मैदाने बंद
-
जिथे करोना केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला
-
सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
-
रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक
-
बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
-
कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना
-
मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
-
चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी
-
बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल
-
शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील
-
20 लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी, लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित
-
विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार