मुंबई :- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री स्वतः कोर्टात गेले व त्यांनी कर्नाटक सरकारकडून प्रख्यात वकील रोहतगी यांची नियुक्ती केली. महाराष्ट्र सरकारने वकील म्हणून हरीश साळवे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री स्वतः कोर्टात गेले व त्यांनी कर्नाटक सरकारकडून प्रख्यात वकील रोहतगी यांची नियुक्ती केली. महाराष्ट्र सरकारने वकील म्हणून हरीश साळवे यांची नियुक्ती करावी. @AjitPawarSpeaks pic.twitter.com/Zu8w0RgreM
— NCP (@NCPspeaks) December 2, 2022
ज्यावेळी आघाडीचे सरकार होते. त्यावेळीही या केस सुरू होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हरिश साळवे यांची नियुक्ती केली होती. हरिश साळवे यांना या प्रकरणाची माहिती आहे.
ऐकावं ते नवलच! टोमॅटोप्रमाणे चक्क झाडाच्या फांदीला लगडले बटाटे, पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
सुप्रीम कोर्टात पहिले पाच वकिलांची नावे घेतली जातात त्यामध्ये वरच्या क्रमांकावर हरिश साळवे यांचे नाव आहे. त्यामुळे ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने हरिश साळवे यांना बुक करावे, अशी आग्रही मागणी अजित पवार यांनी केली आहे.