मुंबई – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘दिशा पटानी’ आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे किंवा इंस्टाग्राम पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. आता, पुन्हा एकदा दिशा चर्चेत आली आहे. आपल्या आगामी ‘मलंग’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या एका मुलाखतीत दिशाला राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिपदावर काही प्रश्न विचारण्यात आले होते.
दिशाला विचारले कि, ‘आता आदित्य ठाकरे राज्याचे मंत्रिपदी आहेत, त्यांच्या कामावर तुझा किती विश्वास आहे, नेमक्या काय अपेक्षा तुझ्या आदित्य ठाकरे यांच्याकडून आहेत’.
त्यावर उत्तर देताना दिशा पटानी म्हणाली कि, ‘खरंतर आदित्य माझा चांगला मित्र आहे, अर्थातच त्याच्या कामावर मला विश्वास आहे. आपल्या देशालाही चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. एवढा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूप चांगली बाब आहे.’ तसेच यावेळी दिशाने आदित्य तोंड भरून कौतुक देखील केलं.
ती पुढे म्हणाली, ‘आदित्य पर्यावरण संवर्धनासाठी काम करत आहेत, जंगल वाचवण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे, यामुळे म्हणता येईल महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे. तसेच मुंबईच्या नाइट लाईफसाठी त्यांनी पुढाकार घेतला, यामुळेच आपण रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरु शकतो, चित्रपट पाहू शकतो’. असं दिशा म्हणाली.
दरम्यान, उद्या (दि. ७) अभिनेता आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि दिशा पटानी अशी दमदार स्टार कास्ट असलेला ‘मलंग’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.