मुंबई – आपल्या महाराष्ट्र राज्यात केवळ पाच-सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे तरुणांनी रक्तदान करण्याची गरज असल्याचेही त्यांनी तरुणांना उद्देशून म्हटले.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहनही आरोग्य मंत्री टोपे यांनी केले.
खरे तर मे महिन्यातही करोना विषाणूच्या महामारीमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा महाराष्ट्रात उपलब्ध होता.
तरुण मोठ्या प्रमाणावर रक्तदान करतात. मात्र करोना आणि लॉकडाऊनच्या काळात रक्तदान शिबिरं झाली नाहीत. त्यामुळे रक्तसाठा निर्माण झाला नाही. आता पुन्हा रक्तदानाची गरज असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.