Bhai Jagtap : महाराष्ट्रावर कर्जाचा भला मोठा डोंगर झाला असून ही संख्या तब्बल ७ लाख कोटींवर पोहोचली आहे. याला केवळ अन् केवळ ‘महायुती’ सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केला आहे. ते शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. Bhai Jagtap |
भाई जगताप म्हणाले, निवडणूकपूर्व केलेल्या पोकळ घोषणांमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये आर्थिक खडखडात असून लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांचे भवितव्य धोक्यात आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांचा सूर एक होता, पण निवडणुकीनंतर मात्र हा सूर ‘बेसूर’ झाल्याचे दिसून येत आहे. म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अद्यापही नाराज असून ते जणू मुख्यमंत्रीच असल्याच्या आविर्भावात आहेत, अशी मिश्कील टिप्पणीही भाई जगताप यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना म्हणाले, घोषणांचा पाऊस सुरू आहे. परंतू प्रत्यक्षात फार काही होताना दिसत नाही. नाही म्हणायला रस्ते विकासकामध्ये थोडे काम दिसते. राज्यावर सात लाख कोटी रूपयांचे कर्ज आहे. जन्माला येणारे प्रत्येक मूल डोक्यावर कर्ज घेवून येत आहे. आणखी वर्षभराने शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही याची शंका आहे, असंही जगतो म्हणाले. Ladki Bahin Yojana |
मुंबई महापालिका कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढवावी
हिंदी विषयाच्या सक्तीने मराठीवर परिणाम होईल असं वाटत नाही. मुंबई महापालिका कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढवावी हे माझे पहिल्यापासून मत आहे. नितीन गडकरी यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतू कित्येक वर्षे झाली तरी त्यांना मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करता आलेला नाही. दळणवळण प्रभावी असेल तर विकास होतो हे वास्तव आहे. परंतू तरीही स्थानिक लोकभावना विचारात घेवूनच निर्णय व्हावा, असंही भाई जगताप म्हणाले. Congress |