नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी निर्यात वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. निर्यात सज्जतेत महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडू ही राज्य आघाडीवर असल्याचे निती आयोगाने यासंदर्भात जारी केलेल्या क्रमवारीत म्हटले आहे.
या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर गुजरात असून दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आणि तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू आहे. या यादीमध्ये किनारपट्टीवरील सहा राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. जी राज्य समुद्रकिनारपट्टीवर नाहीत मात्र त्यांनी चांगली कामगिरी केली आहे, त्यामध्ये राजस्थान, दिल्ली, हरियाणा या राज्यांचा समावेश आहे.
यादी जाहीर करताना निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले की, निर्यात वाढवणे हा आत्मनिर्भर भारताचा अविभाज्य घटक आहे. राष्ट्रीय उत्पन्नातील निर्यातीचे प्रमाण वाढविले तरच भारतातील जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य यांनी समन्वयाने निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला नेटाने काम करावे लागले.
अरेरे, किती पिछाडीवर
भारताची दरडोई निर्यात किती आहे – केवळ 241 डॉलर
दक्षिण कोरियाची दरडोई निर्यात किती आहे – 11,900 डॉलर
चीनची दरडोई निर्यात किती आहे – 18,000 डॉलर