पुणे – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी काही तासात संपणार असतांना सोशल मीडियावर राजकीय रंग चढला चांगलाच चढला आहे. विविध राजकीय मुद्यांना भावनिकतेची जोड देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होत आहे. त्याचा तरुणाईच्या मनावर काय परिणाम होतो, हे निवडणुकीच्या निकालानंतरच दिसेल; पण सध्या तरी या राजकीय मुद्यांवर सोशल मीडियावर चांगलेच घमासान रंगले आहे.
रम्या म्हणतो, २१ तारखेला लोक कमळाचं बटण दाबणार, कारण त्यांना जलयुक्त शिवार हवंय, पूर्वी सारखी धरण भरण्याची भाषा नकोय!#रम्याचेडोस@AjitPawarSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/QzCvMoc2m7
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 19, 2019
यातच,सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने विरोधकांना हल्लाबोल केला आहे. भाजप महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटर अकॉउंटद्वारे ट्विट केले आहे की,’रम्या म्हणतो, २१ तारखेला लोक कमळाचं बटण दाबणार, कारण त्यांना जलयुक्त शिवार हवंय, पूर्वी सारखी धरण भरण्याची भाषा नकोय’ असे ट्विट करत रम्या या काल्पनिक पात्राद्वारे भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
पवार साहेबांनवर टीका करणारे हेच लोक आहे ज्यांनी #नोटबंदी आणि #GST फटाके वाजून स्वागत केल होत…..????
#andh #bhakt #MaharashtraElections2019 #MaharashtraAssemblyPolls @ncp— कॉम्रेड अविष्कार खरात (@Avishkarspeak) October 19, 2019
तत्पूर्वी, देशात सध्या आर्थिक मंदी अन् बेरोजगारीचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत स्थानिक मतदारसंघाच्या विकासाचाही मुद्दा मतदारांमध्ये चर्चेचा विषय होत आहे. गावकट्टा ते सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आले असून, विविध राजकीय नेत्यांना नेटकरी चांगलेच ट्रोल केले गेले.
#hypocrisy की भी सीमा होती हैं…@BJP4India @PMOIndia#hypocrisykepapamodi@OfficeOfPunekar @thepeeinghuman pic.twitter.com/CpNqmgZERL
— कॉम्रेड अविष्कार खरात (@Avishkarspeak) October 12, 2019
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांची आश्वासने अन् स्थानिक विकास कामांची वास्तविकता यावरून सत्ता पक्षांसोबतच विरोधी पक्षाच्या उमेदवारांचीही व्हाट्स ऍप, फेसबुक, ट्युटरसारख्या सोशल माध्यमांवर नेटकऱ्यांकडून चांगलीच कानउघाडणी सुरू झाली आहे. यासोबतच यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराला कोणत्या कामासाठी मतदान कराल, असाही सवाल नेटकऱ्यांकडून विचारल्या जात आहे. विविध मुद्यांवर राजकीय नेत्यांना ट्रोल करण्यासोबतच काही मुद्यांना भावनिकतेची जोड देत मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे.