मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून यामागे भाजपची फूस असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. अर्थात एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना ठेवण्यासाठी प्रथम गुजरात व त्यानंतर आसामची निवड केली होती. ही दोन्ही राज्यं भाजप शासित आहेत. या सर्व घटनांवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदारांवर टीका केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,’या आमदारांना महाराष्ट्राने निवडून दिले आहेत. ते आसाममध्ये काय काय करत आहेत? मतदार संघातील काम कोण करणार ? पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून करोडो रुपयांची बिल चालली आहेत हे योग्य आहे का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आसाममध्ये पूर आला आहे. मला वाटलं तिथं मदत करायला आमदार गेले आहेत, परंतू तिथं जाऊन ते पंचतारांकित हॉटेलमध्ये रहात असल्याचे म्हणत सुळे यांनी आमदारांवर टीका केली.