मुंबई – महाराष्ट्रात नवीन करोनाबाधितांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 47 हजार 827 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. 24 हजार 126 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 202 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. आज मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी लाईव्हद्वारे संवाद साधला. नागरिकांनी करोनाला घाबरू नये मात्र, योग्य ती संपूर्ण काळजी घ्यावी, सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच करोनाचा धोका वाढतच असून दोन ते तीन दिवसात लाॅकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
आजपर्यंत एकूण करोनाबाधितांपैकी 24 लाख 57 हजार 494 जणांनी करोनावर मात केली आहे. दररोज नवीन रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 84.62 टक्के आहे. तर राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.91 टक्के आहे.
राज्यात सध्या 3 लाख 89 हजार 832 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्म हे पुण्यात आहेत. 70 हजार 851 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत 2 कोटी 1 हजार 999 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 29 लाख 4 हजार 076 नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत.