मुंबई – राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात करोनाच्या 35 हजार 756 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 39 हजार 857 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच गेल्या 24 तासात 79 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक असली तरी मृतांची संख्या अद्यापही चिंता वाढवणारी आहे.
दरम्यान, आज राज्यात एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही. आतापर्यंत 2858 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1534 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात करोना रुग्णांचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 71 लाख 60 हजार 293 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.15 टक्के आहे. सध्या राज्यात 15 लाख 47 हजार 643 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3298 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 38 लाख 67 हजार 385 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.