मुंबई : राज्यातील करोनाचे टेन्शन संपले असल्याचे वाटत असतानाच आता आरोग्य यंत्रणांची झोप उडवणारी बातमी समोर येत आहे. राज्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे.मागील काही महिन्यांमध्ये पहिल्यांदाच करोनाची रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढली आहे.कालच्या दिवसभरात तब्बल दीड हजारच्या वर करोना रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या आरोग्य यंत्रणेसमोर पुन्हा एकदा करोनाचे संकट उभे टाकत असल्याचे दिसत आहे. राज्यात बुधवारी करोनाच्या नव्याने बाधित झालेल्या रुग्णांची नोंद ३३४ अशी करण्यात आली आहे.
तर सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल १६४८ पर्यंत पोहचली आहे. तर करोनाबाधित असणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या सगळ्यात सर्वात जास्त ऍक्टिव्ह रुग्णांची ही पुणे जिल्ह्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर पुण्यानंतर मुंबई आणि ठाण्यात जास्त रुग्ण आहेत. पुण्यात ४९६, मुंबई ३६१ आणि ठाण्यात ३१४ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.