राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार व खासदार सध्या गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना गुवाहाटीला जाण्यासाठी आलिशान सुविधांची व्यवस्था केल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या याच दौऱ्यावर आता काँग्रेसकडून टीका केली जात आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण सरकारकडे आशेने पाहतोय, मात्र शिंदे सरकार तिकडे सत्ता वाचावी म्हणून देवदर्शातून व्यस्त आहे, अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
“ताईंची हुशारी…” मोदींचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर निशाणा
अतुल लोंढे यांनी म्हटले की, “राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. नोकरी मिळेल या आशेवर असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. महाराष्ट्रातील तरुणांना नोकरी मिळालीच नाही, मात्र राज्यातील मोठं मोठे प्रकल्प इतर भाजपशासित राज्यात जात आहेत. आता तर भाजपशासित कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी थेट महाराष्टाच्या सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातलील ४० गावांवर हक्क सांगत आहेत.”
“ताईंची हुशारी…” मोदींचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर निशाणा
“राज्यासमोर अनेक संकटे असताना मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी जनतेच्या पैशांवर गुवाहाटीला नवस फेडायला गेले आहेत. महाराष्ट्रातील जनतेसाठी ही सर्वात दुर्दैवी बाब आहे. महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी ५० खोक्यांचा वापर करावा लागला. ५० खोक्यांवरून यांचे आमदार एकमेकांविरुद्ध भांडत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे. मुख्यमंत्री गणपती मंडळांना भेटी देण्यात आणि नवरात्रोत्सवात फिरण्यात व्यस्त राहतात. त्यामुळे त्यांच्याकडे जनतेच्या प्रश्नासाठी वेळ नसतो. देवीला नवस केला आणि कितीही ज्योतिषाला हात दाखवला तरी हे सरकार असंविधानिक असल्याने त्यांचे भविष्य हे न्यालयाच्या हातात आहे.”