मुंबई : करोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. वैद्यकीय आघाडीवरही युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. करोनाशी लढा देण्यासाठी राज्यात संचारबंदी आणि सीमाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल होत आहेत.
हे पाहता नाशिकच्या दत्ता राम पाटील या एका मध्यवर्गीय शेतकऱ्याने आपल्या तीन एकरांपैकी एका एकरात पिकवलेला गहू गरजू व्यक्तींना वाटप केला. त्यांच्या या दानशूरपणाचे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुक केले असून त्याचे आभार मानले आहेत.
Maharashtra: A farmer from Nashik is distributing wheat harvested from 1 acre of his 3-acre land to needy.Datta Ram Patil says,"I am a small farmer.We're not financially stable but if we have 1 chapatti then we can give half to others who are in dire need". #CoronaLockdown (28.3) pic.twitter.com/lesfKF0Js3
— ANI (@ANI) March 29, 2020
एएनआय या वृत्तसंस्थेने याबात ट्विट करत या शेतकऱ्याबदल बातमी दिली आहे. हे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने रिट्विट करत दत्ता राम पाटील यांचे कौतूक केले आहे.
Only Humanity can help us win the war!
Thank you Datta Ram Patil ji for this 🙏🏼 https://t.co/2mqgV6ZXDF
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 29, 2020
मुख्यंमत्री कार्यालयाकडून शेतकऱ्याचे कौतूक करताना म्हटले आहे की, “फक्त माणूसकीच आपल्याला करोनाविरूध्दच्या या युध्दात जिंकण्यासाठी मदत करू शकते. दत्ता राम पाटीलजी या कार्यासाठी तुमचे आभार.”