मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजारपणामुळे मुख्यमंत्रीपद सोडले तर ते पत्नी रश्मी किंवा मुलगा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करू शकतात असे मोठे विधान पाटील यांनी आज केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री 45 दिवसांहून अधिक काळ बेपत्ता आहेत. अशा स्थितीत त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार दुसऱ्या कोणाकडे सोपवावा.
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, ”प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली पाहिजे, मुख्यमंत्र्यांशिवाय प्रशासन चालू शकत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री पाहिजे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्या कोणाकडे द्यायला पाहिजे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करणे हाच उत्तम पर्याय आहे. राष्ट्रवादीवर विश्वास नसेल, तर आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद द्यावे, असे आम्हाला वाटते.”
दरम्यान, उद्धव ठाकरेंऐवजी रश्मी ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मर्यादेत राहावे. कोण मुख्यमंत्री होणार आणि कोण नाही हे ते कसे ठरवू शकतात. अशी प्रतिक्रिया फोजिया खान यांनी दिली आहे.
त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हे प्रकरण आणखी पुढे नेत असंही म्हटलं आहे की, उद्धवजींची तब्येत ठीक नसेल आणि दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवायचे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा. भाजप आणि शिवसेनेचा अडीच वर्षांचा फॉर्म्युला येथे एकत्र येऊ शकतो. असे यावेळी आठवले म्हणाले आहेत.