मुंबई, दि. 25 – आपल्या जादूई आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना “महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. “महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. एखाद्या क्षेत्रात बहुमुल्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास या पुरस्काराने गौरवण्यात येते. यावेळी हा सन्मान गायिका आशा भोसले यांना देण्यात येणार आहे. जगभरातील चाहत्यांनी या पुरस्कारासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
ख्यातनाम गायिका आशा भोसले जी यांना २०२० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. निवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.@ashabhosle
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 25, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.
मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांत त्यांना गायन केले. यापैकी मराठी भाषेतील कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली “केव्हा तरी पहाटे’, “मलमली तारुण्य माझे’, “तरुण आहे रात्र अजुनी’, “मी मज हरपून बसले गं’ आणि आशा भोसले यांचा स्वर लाभलेली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.