पुणे : कर्णधार अंकित बावणेच्या पहिल्या डावातील नाबाद २०४ आणि दुस-या डावातील नाबाद १४ धावांच्या खेळीच्या जोरावर क-गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राने ओडिशावर दहा विकेटने विजय मिळवला. या विजयासह महाराष्ट्राच्या खात्यात ७ गुण जमा झाले आहेत. अंकित बावणे सामन्याचा मानकरी ठरला.
Maharashtra Won by 10 Wicket(s) #MAHvODI @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/bGREFy17K9
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 7, 2020
ओडिशाने प्रथम फलंदाजी करताना राजेश धुपेरच्या नाबाद ११०(१५२) आणि शंतनू मिश्राच्या ८४(२६७) धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद २९३ धावा केल्या होत्या.
End Innings: Odisha – 293/10 in 101.1 overs (Pappu Roy 1 off 4, Rajesh Dhuper 110 off 152) #MAHvODI @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 5, 2020
महाराष्ट्राकडून गोलंदाजीत आशय पालकरने सर्वाधिक ४, सत्यजित बच्छाव आणि मुकेश चौधरीने प्रत्येकी २ तर मनोज इंगळेने १ गडी बाद केला.
End Innings: Maharashtra – 543/5 dec in 149.5 overs (R A Tripathi 65 off 48, A R Bawane 204 off 406) #MAHvODI @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 6, 2020
त्यानंतर महाराष्ट्राने प्रत्युत्तरात फलंदाजी करताना अंकित बावणेच्या नाबाद २०४(४०६), ऋतुराज गायकवाडच्या १२९(२१७), नौशाद शेखच्या १००(१५७) आणि आर. त्रिपाठीच्या ६५(४८) धावांच्या खेळीच्या जोरावर पहिला डाव तिस-या दिवशी ५ बाद ५४३ धावसंख्येवर घोषित करून ओडिशावर पहिल्या डावानंतर २५० धावांची आघाडी घेतली होती.
End Innings: Odisha – 289/10 in 86.1 overs (Rajesh Mohanty 0 off 4, Pappu Roy 4 off 2) #MAHvODI @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 7, 2020
त्यानंतर ओडिशाने दुस-या डावात फलंदाजी करताना गोविंद पोदारच्या ११८(१८७), अनुराग सारंगीच्या ७३(१५२) धावांच्या जोरावर ८६.१ षटकांत सर्वबाद २८९ धावा करत महाराष्ट्रासमोर ४० धावांचे लक्ष्य ठेवले होते. महाराष्ट्राकडून दुस-या डावात गोलंदाजीत मुकेश चौधरीने सर्वाधिक ४ तर आशय पालकर आणि सत्यजित बच्छावने प्रत्येकी ३ गडी बाद केले.
S S Bachhav 4 WICKETS! (24.1-2-80-4), Odisha 289/10 #MAHvODI @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 7, 2020
त्यानंतर ओडिशाकडून विजयासाठी मिळालेले ४० धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने ११ षटकात एकही विकेट न गमवता सहज पूर्ण केले. महाराष्ट्राकडून दुस-या डावात राहुल त्रिपाठीने नाबाद २१(३२) आणि अंकित बावणेने नाबाद १४(३४) धावांची खेळी करत विजय साकारला.