पुणे – मॉब लिचिंग, गो रक्षकांचे हल्ले या प्रकारामुळे सध्या समाजात जो सामाजिक असंतोष निर्माण होत आहे. त्याला पूर्णत: सध्याचे सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक लढा उभारण्यासाठी महाराष्ट्र बहुजन आघाडीचा पहिला निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा उद्या (दि. 29 सोमवारी) बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती आघाडीचे निमंत्रक मिलिंद पखाले यांनी आज दिली.
केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशातील सामाजिक वातावरण गढूळ केले आहे. त्यामुळे आज प्रत्येक समाजात असंतोष निर्माण झाला आहे तर काही समाजात भीती व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेसच्या काळात समाजाचा वापर हा फक्त मत देण्यासाठी केला जायचा पण भाजपा सरकारने आपल्या काळात मते मागण्याया पलीकडे जावून प्रत्येकाच्या मानसिकतेवर हल्ला केला आहे. हा मानसिकते हल्ला केला जातो.