मुंबई: गेल्या वर्षी सात माओवाद्यांना अटक करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) आंध्र प्रदेश सरकारने 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने बुधवारी दिली.
महाराष्ट्रातील एटीएसच्या एका टीमने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आंध्र प्रदेशातील काही शहरांमध्ये छापे टाकले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी आणि माओवादी विचारसरणी पसरवण्यासाठी तयार केलेल्या गोल्डन कॉरिडोर समितीच्या सात माओवाद्यांना अटक केली होती. यावेळी त्या माओवाद्यांना अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीअंती एटीएसने आणक्झीन एका माओवाद्याला अटक केले. नंतर अटक केलेल्या माओवाद्याचे नाव कृष्णा लिंगाया घोष्का उर्फ वेणुगोपालन असे होते.वेणुगोपालनहा 2012 मधिल एका प्रकरणात आंध्र प्रदेश पोलिसांना हवा होता. त्यामुळे त्यांनी वेणुगोपालनवर आठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
सदर प्रकरणी काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश सरकारतर्फे महाराष्ट्र शासनाशी संपर्क साधत सदर माहिती देत वेणुगोपालनला अटक करणाऱ्या टीमला हे बक्षीस जाहीर झाल्याची माहिती देत कौतुक पत्रासह बक्षिसाची रक्कम हैदराबादच्या गुप्तचर विभागाने महाराष्ट्र पोलिस महासंचालकांना पाठविली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.