पुणे – सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 20 खेळाडूंचा संभाव्या संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाचे नेतृत्व राहुल त्रिपाठीकडे सोपवण्यात आले असून केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाड यांचाही समावेश करण्यात आला आहे.
ही स्पर्धा पुढील वर्षी 10 जानेवारीपासून सुरु होणार आहे. महाराष्ट्राचा या स्पर्धेसाठी एलीट क गटात समावेशकरण्यात आला आहे. या गटात महाराष्ट्रासह गुजराथ, छत्तीसगड, हिमाचर प्रदेश, बडोदेव उत्तराखंड या संघाचा समावेश आहे. साखळी स्पर्धेतील सर्व सामने वडोदरा येथे होणार आहेत.
संघ – राहुल त्रिपाठी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख, केदार जाधव, रणजीत निकम, अझीम काझी, निखिल नाईक (यष्टीरक्षक), विशांत मोरे (अतिरीक्त यष्टीरक्षक), सत्यजीत बच्छाव, तरणजीतसिंग धिलन, शमशुझमा काझी, प्रदीप दाढे, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, दीग्विजय हिंगणकर, राजवर्धन हणगरगेकर, जगदीश झोपे, स्वप्निल गुगळे, धनराज परदेशी आणि संनी पंडीत.