महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचे प्रकरण
नवी दिल्ली – पाकिस्तानातील लाहोर शहराच्या किल्ल्यात असलेल्या महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ भाजप व त्यांच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासासमोर जोरदार निदर्शने केली.
पुतळा विटंबना प्रकरणात पाकिस्तानने माफी मागावी आणि तेथे पुन्हा पुतळा वसवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. निदर्शकांना पाक दूतावासाच्या खूप अलिकडेच रोखण्यात आले होते.
महाराजा रणजितसिंग यांचा नऊ फुट उंचीच्या ब्रॉंझच्या पुतळ्याची मंगळवारी काही समाजकंटकांनी मोडतोड केली आहे. या घटनेचा भारत सरकारनेही निषेध करून पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.
आपल्या देशातील अल्पसंख्याकांवर दहशत पसरवण्यासाठीच असे प्रकार पाकिस्तानात केले जात असल्याची टीकाही भारत सरकारने केली आहे.