मुंबई – कोरोना या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात अक्षरशः थैमान घातले आहे. भारत देखील कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सर्व नागरिक आपल्या घरात बसून आहे.
लॉकडाऊन काळात विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मजुर-कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणारे कामगार, मजूर यांचे खाण्याचे हाल होऊ लागले आहेत. अशा कठीण प्रसंगी महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
अमिताभ बच्चन यांच्यावतीने एबी कॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव गरजूंना मदत करत आहेत. त्यांनी हाजी आली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहेब ट्रस्टच्या मदतीने दररोज शिजवलेल्या अन्नाच्या पॅकेटचे वाटप देखील सुरू केले आहे.
एका प्रसिद्ध वृत्तपत्र नुसार,अमिताभ बच्चन यांनी 28 मार्च पासूनच अरब गली, अंटोप हिल, वर्ली लोटस, माहिम दर्गा , हाजी अली दर्गा, धारावी आणि सियोन मुंबईच्या या ठिकाणी अन्नाचं वाटप करण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, अमिताब बच्चन यांनी प्रसारमाध्यमांना या कामाची खबर लागू नये म्हणून याचा कुठेही गाजावाजा केला नाही.