पाचगणी (प्रतिनिधी) – महाबळेश्वर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटाचे प्रचंड नुकसान झाले होते.
या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांनी आंबेनळी घाट दुरुस्ती करीता उद्या (दि. 14 जुलै , गुरूवार रोजी) सकाळी 11 ते 5 यादरम्यान बंद करण्याचे पत्र महाबळेश्वर तहसीलदारांना दिले आहे, अशी माहिती गोंजारी यांनी दिली.
हा राज्यमार्ग ठिकठिकाणी भूःसखलनाने घोक्याचा झाला आहे. याबाबत उपाययोजना म्हणून सुरक्षिततेच्या बाबीचा विचार करता वाढता पावसाचा जोर लक्षात घेऊन ही दक्षता घेतली जात आहे.