जवळपास 3 दशकांच्या कारकिर्दीमध्ये माधुरीच्या नावावर अनेक संस्मरणीय सिनेमे जमा झाले आहेत. तिचे बहुतेक सिनेमे प्रेक्षकांसाठी फेव्हरेट आहेत. पण यापैकी कोणत्या सिनेमाचा रिमेक व्हावा असे माधुरीला विचारले असता, तिच्याकडून अगदी अनपेक्षित उत्तर मिळाले.
या प्रश्नावर तिच्याकडून कदाचित “तेजाब’ किंवा “हम आपके है कौन’ हे उत्तर मिळेल असे वाटले होते. मात्र तिने अगदी अनपेक्षितपणे 1990 च्या “सैलाब’चे नाव घेतले. रिमेक केला जावा अशी या सिनेमाची क्षमता आहे.
“सैलाब’चा रिमेक केला जाऊ शकेल, असे माधुरी म्हणाली. यूट्यूब चॅनेलवर एका रॅपिड फायर प्रश्नावलीला उत्तरे देताना तिने आपली पसंती सांगितली. “सैलाब’मधील “हम को आज कल है, इंतजार’ हे गाणे खूप पॉप्युलर झाले होते. तसेच त्याची कथाही खूप छान होती, खूप वेगळी होती.
पुन्हा प्रेक्षकांपुढे आणली जावी अशीच ही कलाकृती होती, असे माधुरी म्हणाली. अर्थात फिल्म इंडस्ट्रीला नवीन कल्पना आणि नवीन लेखनाची गरज आहे. तसे जर मिळाले तर यापेक्षाही अधिक चांगली कलाकृती केली जाऊ शकते.
“सैलाब’मध्ये माधुरीबरोबर आदित्य पांचोली होता. “सैलाब’ हादेखील 1988 च्या तमिळमधील “कान सिमित्तम नेराम’चा हिंदी रिमेक होता.