शाहूपुरी – दोन दिवसांपासून ढगाळ हवामान येत असल्यामुळे हाती आलेली पिके काढण्यासाठी शाहूपुरी येथील अंबेदरे, कोंडवे परिसरात शेतकऱ्याची लगबग सुरू झाली आहे, ज्वारी, गहू काढणी, मळणीच्या कामाला वेग आला आहे.
परतीच्या दमदार झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात पोषक असे वातावरण होते, पाणी टंचाई फारशी न जाणवल्यामुळे रब्बीतील बहुतांशी पिकांची वाढ चांगली झाली आहे, सध्या मोठ्या प्रमाणात रब्बी ज्वारी व गहू, पिकांची काढणीसह मळणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जात आहे.