लंडन : समाजात कुटुंब व्यवस्थेला महत्त्व असते त्यातही पती पत्नी यांचे संबंध कुटुंबाचा अविभाज्य भाग असतात नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाप्रमाणे जोडीदारांपैकी एकाचे निधन झाले. तर दुसऱ्या जोडीदाराचे आयुष्यमानही काही प्रमाणात कमी होते .त्यातही पतीच्या निधनानंतर पत्नीला जेवढा त्रास होत होता. त्यापेक्षा जास्त त्रास पत्नीच्या निधनानंतर पतीला होतो आणि त्याचे आयुष्यमान जास्त घटते असे या अहवालात म्हटले आहे.
डेन्मार्कमध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आले असून सहा वर्षांच्या कालावधीमध्ये नऊ लाख 25 हजार वृद्ध जोडप्यांचा अभ्यास करण्यात आला. 65 ते 70 या वयोगटातील एखाद्या पुरुषाच्या पत्नीचे निधन झाले तर त्यापैकी 70 टक्के पुरुषांचेही केवळ एक वर्षाच्या कालावधीमध्ये निधन झाल्याची बाब या संशोधनात समोर आली.
महिलांचा विचार करता पतीचे निधन झाल्यानंतर वर्षाच्या कालावधीत पत्नीचे निधन होण्याचे प्रमाण 27% होते हा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी हे निष्कर्ष जरी जाहीर केले असले तरी या निष्कर्षाचे कोणतेही कारण देणे त्यांना शक्य झालेले नाही. पण एखादी वृद्ध पत्नी जेव्हा आजारपणामध्ये वृद्ध पतीची सेवा करत असते, तेव्हा तिची मानसिकता जास्त कणखर झालेली असते.
त्यामुळे पतीच्या निधनानंतर सुद्धा ती त्याच कणखर मानसिकतेत राहते. त्यामुळे तिच्यावर फारसा परिणाम होत नाही. याच्या उलट परिस्थिती पतीची असल्यामुळेच पत्नी गमावल्यावर अनेकांचे आयुष्यमान कमी होत असावे असा या संशोधकांचा अंदाज आहे.