वॉशिंग्टन: दिवसभरात विविध कारणांनी आलेला राग किंवा विविध कारणांनी झालेली भांडणे याला जर रात्रीं झोपे पूर्वी पूर्णविराम मिळाला तर त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते अशा प्रकारचे संशोधन समोर आले आहे.
अमेरिकेच्या ओरेगोन स्टेट यूनिवर्सिटी ने आपल्या संशोधनात हा दावा केला आहे विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी 32 ते 84 या वयोगटातील विविध लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला असून दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य जगण्याचे सिक्रेट उघड केले आहे.
या संशोधनाप्रमाणे लोकांनी त्या दिवशी आलेला राग जर त्याच दिवशी संपुष्टात आणला तर त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसाच्या कामकाजावर होत नाही आणि रात्री शांतपणे झोप लागल्यामुळे आपोआपच निरोगी आयुष्य जगता येते सर्वात महत्वाचे म्हणजे झोपण्यापूर्वी जर मनातून नकारात्मक भावना बाजूला केल्या तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो असे या संशोधनात म्हटले आहे.
याउलट अशा नकारात्मक भावना घेऊन जर एखादी व्यक्ती झोपी गेली तर त्यामुळे आपोआपच मानसिक तणावात वाढ होते आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो या विद्यापीठाने एकूण 2022 लोकांवर हे संशोधन केले त्यामध्ये असे आढळून आले की ज्येष्ठ नागरिक आपला राग आणि भांडण विसरून जाण्यात आघाडीवर आहेत. पण 45 पेक्षा कमी वय असलेला वयोगट नकारात्मक भावना पटकन बाजूला करू शकत नाही.
त्यामुळे त्यांचा मानसिक तणाव वाढतो. या संशोधनाचे प्रमुख रॉबर्ट कावस्की यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी ताण तणावाला सामोरे जावेच लागते या ताणतणावावर योग्य नियंत्रण ठेवण्यात जर ती व्यक्ती यशस्वी झाली तर त्याला दीर्घायुष्य लाभो शकते आणि त्याचे मन आणि शरीर निरोगी राहू शकते