सातारा – धरणामध्ये व प्रकल्पामध्ये जमिनी गेल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या दोन पिढ्या बरबाद झाल्या आहेत. या धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी लढा सुरू आहे शासन तो ऐकायला येत नाही. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्व धरणग्रस्त मुंबई येथे लॉंग मार्च काढणार आहे, जोपर्यंत धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या देण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्याच्या सर्व जिल्ह्यातून धरणग्रस्त लॉंग मार्चने मुुंबईकडे निघतील. यानंतर मुंबई येथे ज्या जमीनी प्रकल्पग्रस्तांन वाटण्यात आला. तत्पूर्वी पुनर्वसन प्राधिकरणकडे अहवाल पाठवला पाहिजे ज्यात पुनर्वसनाचे सर्व काम झाले आहे.
सर्वांना गावठाणे देवून झाले, प्लॉट देवून झालेत त्यानंतरच प्रकल्पाची घळभरणी झाली पाहिजे. असा चांगला कायदा असताना जर जमीन वाटप झालेली नसेल तर हा दोष धरणग्रस्तांचा दोष नाही. जर जमीन वाटप ज्या दिवशी झाले त्या दिवशीची मुळ किंमतीच्या 12 टक्के व्याज कब्जेपट्टीची रक्कम धरणग्रस्तांनी का द्यावी. ती संबंधित जमीन कसणाजयांनी द्यावी किंवा जिल्हाधिाकरी यांनी भरावी. तुम्ही जे काम केले नाही त्याचे पैसे धरणग्रस्तांकडून का वसूल करता निर्वाह भत्त्यातून 12 टक्के व्याज वसूल केले जात आहे.
ज्यांची जमीन संपादन झाली त्यातली कुणीतरी कसली. हा भाडेपट्टा कधीही वसूल केला नाही. ज्यांनी केला नाही त्यांच्याकडून घ्यावा आजही त्या जमीला पाणी नाही ज्या जमीनीला पाणी मिळणार नाही त्याचा चौपट पाणी द्यावे. पाणी जमीनीला देत नाही तोपर्यत बागायत आणि जिरायतचा जो फरक आहे
तो द्यावासरकारनेच आम्हाला पैसे दिले पाहिजे. हा जीआर मागे घ्या. धरणग्रस्तांना ओरबाडायचे कायदे रद्द करा अशी मागणी डॉ पाटणकर यांनी केली. या मागण्यांसाठी मंत्रालयावर येत्या जानेवारीत लॉंग मार्च काढण्याचा इशारा डॉ पाटणकर यांनी यावेळी दिला .